मंत्र -|| ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ||
माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे.
मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे.
नवार्ण = नऊ अक्षराचा
मंत्र.
या मंत्रामध्ये
नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व
स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे.
भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत,
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
या तिन्ही रूपांची साधना
करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा
हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने
नवग्रहांना शांत केले जाते.
नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे.
ह्रीं = महालक्ष्मीचा बीज
मंत्र आहे.
क्लीं = महाकालीचा बीज
मंत्र आहे.
याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे -
प्रथमं शैलपुत्रीच,
द्वितीयं ब्रम्हचारिणी |
तृतीयं चन्द्रघंटेती,
कुश्मांडेती चतुर्थकम ||
पंचमं स्कन्दमातेती,
षष्ठं कात्यायनितीच |
सप्तमं कालरात्रीति,
महागौरीती चाष्टमम ||
नवमं सिधीदात्रीच,
नवदुर्गा प्रकीर्तिता |
उक्तान्येतानि नामानि
ब्रम्हनैव महात्मना ||
ऐं = प्रथम =शैलपुत्री = सूर्य
ह्रीं = द्वितीय =
ब्रम्हचारिणी = चंद्र
क्लीं = त्रितीय =
चन्द्रघंटा = मंगळ
चा = चतुर्थ = कुश्मांडा
= बुध
मुं = पंचम = स्कन्दमाता
= बृहस्पती
डा = षष्ठं = कात्यायनि =
शुक्र
यै = सप्तमं = कालरात्री
= शनि
वि = अष्टमं = महागौरी =
राहू
च्चै = नवमं = सिधीदात्री
= केतू
१) मारण = क्रोध, मद, लोभ आदिचा नाश करणे. यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो. या मंत्राच्या
जपणे शत्रुपक्षाची शक्ति क्षीण केली जाते.
४) स्तम्भन = या
मंत्राच्या के माध्यमाने आपल्या इन्द्रियांच्या विषय-विकारांना थांबवले जावू शकते.
५) उच्चाटन = या मंत्राद्वारे मोह, ममता, लिप्तता आदि त्याग करून साधक मोक्ष प्राप्ति साठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगता पासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते.
या महामंत्राच्या जपात उपर्युक्त भाव, साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्या पर्यंतच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी, या महामंत्राचा लाभ, पूर्ण पात्रताप्राप्त सद्गुरु च्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जावू शकतो.
या त्रिशक्ति जगदम्बा सर्वार्थ सिद्धि मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करतो. साधक जेवढा या मंत्राच्या उर्जेने एकाकार होत जातो, तेवढा तो प्रकृतिसत्तेशी एकाकार होत जातो. या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो..
(सोशल मीडिया वरुन साभार)